Chhatrapati Shivaji Maharaj Katha : शिवरायाचें आठवावें रूप, शिवरायाचा आठवावा प्रताप;

Comments · 178 Views

केवळ महाराष्ट्र किंवा भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगभरात शिवाजी महाराजांचे नाव आदराने घेतले जाते. ज्यांच्या सा

 
केवळ महाराष्ट्र किंवा भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगभरात शिवाजी महाराजांचे नाव आदराने घेतले जाते. ज्यांच्या साहस कथा, विचार, तत्त्वज्ञान आजही सर्वांना प्रेरणा देतात, अशा छत्रपती शिवाजी महाराजांची १९ फेब्रुवारी रोजी जयंती झाली, आता येणाऱ्या सोमवारी २१ मार्च रोजी महाराजांची तिथीप्रमाणे जयंती आहे. हिंदू पंचांगात तिथीला देखील महत्व असते. शिवाजी महाराजांचे अनेक किस्से नेहमी शिकवण देत असतात आणि त्यांना रोजच आठवणीत ठेवले तर अनेक अडचणींवर मात करण्यासाठी एक मंत्र नक्की मिळेल .
गड-किल्ले
शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करताना सुमारे ४०० गड आपल्या अधिपत्याखाली आणले होते. काही गड त्यांनी स्वतः बांधले, तर काही किल्ले लढाया करून जिंकले. महाराजांचा एक एक गड-किल्ला म्हणजे स्थापत्यशास्त्र, व्यवस्थापन आणि गनिमी काव्याचे प्रतिकच होते.
महाराजांचे जातीवंत घोडे
शिवाजी महाराजांकडे अनेक जातीवंत घोडे होते. शिवाजी महाराज घोड्यांचा वापर निर्णायक प्रसंगी करत असत. शिवाजी महाराजांनी अनेक मोहिमांमध्ये घोड्यांचा वापर नेमकेपणाने केला. शिवाजी महाराजांकडे मोती, विश्वास, तुरंगी, इंद्रायणी, गाजर, रणभीर, कृष्णा असे सात घोडे होते. कृष्णा या पांढऱ्या घोड्यावर शिवाजी महाराज राज्याभिषेकानंतर बसले होते. सुरतवर चढाई, आग्र्याहून सुटका अशा मोहिमा दाखल्यादाखल देता येतील.
अशी शेतकऱ्यांच्या मिठाची मागणी वाढली
महाराष्ट्राच्या किनार पट्टीवर १६७१ मध्ये मीठ शेती केली जायची. परंतु इंग्रज, डच, पोर्तुगीज यांनी तेथील शेती मोडीत काढण्यासाठी गोवा प्रांतातून मीठ आणून त्याची स्वस्तात विक्री सुरू केली. हे लक्षात आल्यावर महाराजांनी आयात मिठावर कर लावला. त्यामुळे आयात मीठ महाग झाले व आपल्या शेतकऱ्यांच्या मिठाची मागणी वाढली. म्हणूनच छत्रपतींना 'जाणता राजा' म्हणतात. अशा अनेक गोष्टी छत्रपतींनी रयतेसाठी पुढाकार घेऊन केल्या.
छत्रपती शिवाजी महाराज अतिशय चारित्र्यसंपन्न होते. जगाच्या इतिहासात हा एकमेव राजा आहे, ज्याच्या दरबारी कधी स्त्री किंवा नर्तकी नाचली नाही. महाराजांनी स्वतःसाठी मोठे महाल बांधले नाहीत. सत्तेचा वापर स्वतःच्या किंवा कुटुंबाच्या फायद्यासाठी केला नाही. शिवाजी महाराज नेहमी 'रयतेच स्वराज्य' असाच शब्द वापरत.
Comments